Friday, December 31, 2010

नको!!!!!!

नको! नको! नको!
आत्ता नको मला त्या प्रेमाच्या कविता....
ज्याच्या त्याच्या ब्लोगवर फक्त प्रेमाच्याच कविता...वीट आला आहे,
कोणला दुसरा कोणता विषयच मिळत नसावा का लिहण्यासाठी???
मग मी विचार करते का बरे असे असावे?????
कदाचित अस असाव प्रेमावर लिहण सोप आहे..... म्हणून कोणी ही प्रेमावर लिहू शकत
तर नाही, आजकल प्रेम म्हणजे अगदी बाजारात मिळणारी भाजी झाली आहे...
लोकांचा प्रेमाचा संदर्भच बदलला आहे....
मग का माझ्या ब्लोगवर नाही का प्रेम-कविता तर आहेत....
पण मी जेव्हा ते अनुभवल तेव्हाच लिहल्या....
मग बाकीचे लोक काय अनुभवाशिवायच लिहिता का(?) तस मी म्हणत नाही.
पण त्यात तो खरे पण मला दिसत नाही...
मग ते कुठे तरी खटकत...आणि खर प्रेम काय असत असा प्रश्न पडतो......
काही तरी लिहण ह्या साठी अस काही वेगळ स्किल लागत नाही, पण आपल्या मनातल खरं नीटपणे वर्णन करणे महत्वाच असत....
खरे पणा हवा लिहण्यात..... बस बाकी काही नाही....
उगीच मुखवटा नको.... 

Wednesday, December 29, 2010

माझे बाबा २

आज पुन्हा मला माझ्या बाबांबद्दल लिहायची संधी मिळाली. खरंच त्यांच्या इतक्या साऱ्या गोष्टी आहेत की काय लिहावे तेच सुचत नाही मग, मला जे जे प्रसंग आठवतात किवां जे जे घडत ते मी लिहून काढते. ह्या आधी देखील मी माझ्या बाबांबद्दल लीहल आहे ह्याच ब्लोगमध्ये “माझे बाबा“ असा एक लेख आहे. आता पुन्हा....
आज जो प्रसंग घडला, ह्या प्रसंगाने मी स्वतःला ओळखलं आणि मला माझे भविष्य स्पष्ट दिसायला लागल. रोज प्रमाणे सकाळी वर्तमानपत्र आले आणि रोज प्रमाणे बाबा ते वर्तमानपत्र वाचत होते आणि मी संगणकावर ई-वर्तमानपत्र वाचत होते. पण आज समजल बाबा जे वाचतात ते माझ्या ई-वर्तमानपत्र खरंच नसत. “आज खऱ्या अर्थाने मी माझ्यातल्या ‘मी’ ला ओळखू शकली.” आणि त्याच श्रेय बाबांनाच जात. ह्या आधी पण मी माझ्या बाबांन बद्दल लीहल आणि आज पुन्हा मला संधी मिळाली,
त्यांनी एक लेख वाचला एका मुली बद्दलचा आणि मला वाच सांगितल, मी तो वाचला, त्या लेखातून घेण्यासारख खूप काही होत आणि मी ते घेतल देखील. त्यात होत, “एक मुलगी लग्न झाल्यावर कशी बदलते आणि संसारात कशी अडकते, पण ह्या सर्व गोष्टीतून तिने कसा वेळ काढला पाहिजे आणि स्वतःतल्या गुणांना कसा वाव दिला पाहिजे, जगा सोबत चालून आपल्या घराला पण कसे चालवावे(?). हे सार होत त्यात, त्या लेखातली ती मुलगी एका मोठ्या पदावर कार्यरत आहे आणि त्या सोबत ती छानस आयुष्य जगते आहे”. पण बाबांनी मला तो लेख देऊन, माझ्याशी न बोलता जे काही बोलले ना ते माझ्या साठी खूप होत, त्या लेखा पेक्षा पण जास्त. त्या लेखातल्या त्या मुलीमध्ये त्यांनी कुठे तरी मला बघितल आणि त्यांना मला ते सांगावसं वाटल आणि खरंच मला जगण्याचा नवा उद्देशच मिळाला आणि खूप आनंद झाला, जो मला ह्या आधी कधीच झाला नव्हता. जाणीव झाली की मी खऱ्या अर्थाने मोठी झाली आहे.
त्यांना मला सांगायच होत तू तुझ्यातल्या सर्व चांगल्या गोष्टींचा, गुणांचा आणि माझ्या संस्काराच नाव मोठ्ठ कर. तुझ्यात काही तरी आहे त्याला कधीच तुझ्यातून नष्ट होऊ देऊ नकोस. त्याला तू अत्तरा प्रमाणे जप, जेव्हा केव्हा तू त्याला शिंपडशील तेव्हा तेव्हा ते सुगंध पसरवेल. नेहमी प्रमाणे बाबांनी मला समजावला ते वेगळ्या भाषेत, त्यांचा उद्देश नेहमी असाच, मी काही तरी वेगळ करून दाखवावं असाच आणि त्यांच्या ह्या विश्वासानेच मला एक शक्ती मिळते. त्यांना माझ्यात कुठेतरी एक मोठी व्यक्ती दिसते, मोठी व्यक्ती जगासाठी नाही तर ती त्यांच्यासाठी, त्यांना त्यांच्या लाडक्या लेकीला एक सुजाण आणि लोकांनी दखल घ्यावी अशी व्यक्ती झालेलं पाहायच आहे. ह्या बद्दल त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि माझा  त्यांच्या अशीर्वादांवर. 
कधी, कधी असे झाले?
नकळत असे झाले,
स्वप्नाचा जगात कधी पोहचले.

काही गोष्टी अशक्यच असतात का?
त्या फक्त स्वप्नच असतात का?
इच्छाशक्ती सर्वकाही मिळूवून देते.
असतर माझा सोबत झाल नाही.

पण मी, मी आशा सोडली नाही,
मला जे हव ते मिळवणारच,
लढणारच, देवाला सांगणार,
तू मला दिला नाही तरी मी घेणार,


नशीबा पेक्षा कमी-जास्त,
कोणाला काही मिळत नाही,
पण, नशीब आपणच बनवतो,
चंगल कि वाईट

हेच शोधन आयुष आहे,
आयुष्य कसा आहे तेच शोधते आहे.

...पिनल चौधरी

Monday, December 20, 2010

वधू....

क्षणात सारे बदलते आहे....अन बदलणार आहे
स्वप्नाळू मी आजही, अन उद्याही
पण संदर्भ बदलतील स्वप्नांची...                    
          
फक्त स्वप्नाळू नाही तर, जिद्दी ही तेवढीच मी
स्वप्न पूर्तीस नेण्यासाठी... त्यासाठी लाभली होती
सोबत माहेराची आत्ता ती असेल सासरची ही. 

नवी नाती, नवी गोती, घर सोबत सोबत नवी माती...
त्याच मातीला सुगंधित करणार मी प्रेमाच्या,
मायेच्या अन विश्वासाच्या वर्षाधारांनी...


आईच होती प्रत्येक सुख दुखःत, आत्ता मिळणार सोबत सासूची...
बाबांचे शब्द अमूल्य नेहमीच, जगण्याचा दृष्टीकोन दिला त्यांनी
तो तसाच मिळणार आत्ता, सासऱ्यांच्या नजरेतुनी...


भाऊ,बहिण,काका,काकी नाती तीच...पण मणसे नवी..
ही नवी रंग भरली ज्याने माझ्या आयुष्य-चित्रात
असा माझा जीवनसाथी.             


त्याचीच साथ घेऊन चालणार, वाटेत जरी आले काटे
मखमली करणार त्याच्या प्रीतीनी....माझी वाटचाल
स्वप्नांच्या पलीकडल्या नव्या क्षितिजांनासाठी.   

अशी असती माझी सात पाऊले,
देवाला नमुनी मागते शक्ती,
अन सुरवात करते नाव्यायुष्याची!!! 


...पिनल चौधरी!!!

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...