Friday, October 1, 2010

भीती.

भीती...
मला नेहामी वाटत माणसाच्या जगण्याचा उद्देश त्याच्या भीतीतून निर्माण होतो, कुठे त्याची भीती खरी तर नाही ना होणार?? ह्या विचाराने..... मग सुरु होतात त्याचे पराकाश्तीचे प्रयत्न, धडपड, आटापिटा त्याला थांबवण्याचा मग खरा प्रवास सुरु होतो आयुष्यचा. कदाचित म्हणूनच माणूस भीतीला भीत भीत जगण्याचा खरा आनंद हरवून बसतो....
आणि तशेच काहीसे मी अनुभवले...
पण माझी भीती वेगळीच “माझी भती अशी की कुठे मी ती भीती खरी होऊ न देण्याच्या भीतीत तर जगणार नाही ना” थोड कठीण आहे पण खर आहे.


माझ्याच विचारांची मशाल घेऊन
प्रकाश करायला निघाली
माझ्या अंधारमयी जीवनात आणि
त्या आगीत जळत राहिला माझा विश्वास

त्याची मला न कल्पना होती
न त्याची जाणीव,
विश्वासाला जाळून मी
कस करेल स्वतःला प्रकशित?

इथवर पेटत आली ती
मशाल माझ्याच सोबतीत,
पण सोबत हरवली माझी
मग कस येणार ते तेज माशालीस  

असेल प्रकाश निराळा अमुचा
असा होता दावा,
स्वतःच कधी राख होऊन
गेलो अश्रुत मिसळून. 

गमावली मी ती शक्ती अन उमेद
पुन्हा पेट घेण्याची....
बस मग मी झाली पक्षी पिंजरयातली.....
अन होती खरतर त्याचीच भीती.
  
...पिनल चौधरी 

3 comments:

तू .....

सावलीत तुझ्या विसावले होते..  मनालाही माझ्या सुखावले होते.. ते क्षण तुझे नि माझे...  मला जगायचे होते.. का कुणास ठाऊक आज ती सका...